अशी पाखरे येती .

Friday, January 11, 2013

एक दु:खद लव्ह स्टोरी

एक दु:खद लव्ह स्टोरी
“आज तिचा फोन आला ,,
शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ,,
स्वतःला सावरून तिन सांगितलं ,अरे माझलग्न ठरलं ,,
ती सावरली पण तो क्षणात ढासळला ,,
अन मग दोघ्यांच्या आसवांपुडे पावसाचावर्षाव कमी वाटू लागला ,,
शब्द सगळे हवेत विरले.,,
ती म्हणाली माफ करशील ना रे मला ??
तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस ?
कर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन राखातेस ,,
या जन्मी नाही झालीस माझी ,,
तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल ,,
ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त
तुझी प्रतिमा असेल ,,
धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला,,
कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात जाऊन उभा राहिला ..

I Miss YOU.........

,आपल्या आवडत्या व्यक्तीला वेळ देऊ
शकला नाहीत तर
.,दुरावा वाढतो अंतर वाढते
.यात चूक त्याची पण नसते आणि तिची पण
नसते
.चूक वेळेची असते
.यावर एकाच उपाय आहे
,त्या व्यक्तीला जितके क्षण द्याल ते असे
द्या कि
.तुमच्या सोबतचे ते दोनच क्षण
त्या व्यक्तीच्या एकांतातल्या शंभर
क्षणावर भारी पडतील
.,जीवाला जीव देणारी माणसं खूप
कमी असतात त्यांना असे गमवू नका
".आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते.
I Miss YOU.........

Saturday, September 8, 2012


शोभा आणि निलेश यांनी पाच वर्षाँच्या रिलेशनशिप नंतर breakup केलाय.शोभाचंम्हणणं आहेकी निलेश मला वेळच देऊ शकत नाही तोमला टाळतो.आणि निलेशचं म्हणणं आहे की शोभाचा फोन कायम तिचा दादानाहीतर पप्पाच उचलतात.शोभाच्या फोनला स्पीकर प्रोब्लम असल्यामुळे समोरच्याचा आवाज बदलुन ऐकु येतो त्यामुळे त्याची नेमकी गोची होते.अशा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे त्यांच्यात breakup होतो.काही दिवसांनी दोघांचही मन रमतनसतं.मग शेवटी शोभाला एक उपाय सुचतो.ते म्हणजे फेसबुकवर अकाउंट काढायचं आणि त्यामध्ये मन रमवायचं.शोभा ठरवतेकी आपण दुसर्या मुलीच्या नावाने अकाउंट काढायचं.ती श्रेया पाटील या नावाने अकाऊंट सुरु करते.तिच्या आवडत्या अभिनेत्रीचा फोटो प्रोफाईल पिक्चर म्हणुन सेट करते.काही वेळातच तिला मुला मुलीँच्या फ्रेँड रिक्वेस्ट येऊ लागतात.त्यांच्यात चॅटीँग सुरु होतं.पण फेसबुकवरील एकाच मुलासंगे चॅटींग करायला तिला खासआवडु लागतं.रंजित देशमुख असं त्या मुलाचं नाव असतं.
सकाळच्या gd morning पासुन झालेली सुरुवात ते रात्री gd n8 पर्यँतचा वेळ देखील त्यांना अपुरा पडायचा.रंजितला श्रेयाच्या बोलण्यातील गोडवा आणि श्रेयाला(शोभा) त्याचा हजर जवाबी पणा खुपच आवडत असतो.जिथे निर्णय हृदयातुन घ्यावे लागतात त्यावेळी श्रेयाची मदत रंजित घेतअसतो,आणि जिथे निर्णय हुशारीने घ्यावे लागतात तिथे रंजितचा सल्ला श्रेया घेत असते.सहा महीन्यांच्या चॅटींग नंतर एकमेकांना ते असे पुरक झालेले असतात.एक दिवसही ते एकमेकांना फेसबुकवर भेटल्याशिवायबोल ल्याशिवाय राहु शकत नाहीत.thatmeans theyr in love.मग शेवटी रंजित तिचा फोन नं घेतो.एकमेकांसोब त फोनवर बोलणं चालु होतं.काही महीन्यातच ते एकमेकांशी भेटण्याची इच्छाही व्यक्त करतात.जवळच्या एयरपोर्टवर भेटण्याचं ठरवतात.एकमेकांना ओळखण्यासाठी रंजित श्रेया पाटील नावाचा बोर्डहातात घेऊन एयरपोर्टवर येतो.आणि ठरल्याप्रमाणे शोभा रंजित देशमुख नावाचा बोर्ड घेऊन तिथेच येते.रंजितला आपल्या नावाचा बोर्ड हातात धरलेली एक मुलगी दिसते आणि शोभालाही श्रेया पाटीलया तिच्या फेसबुक नेमची पाटी घेऊन एक मुलगा आपल्याकडे येताना दिसतो.पण दोघे एकमेकांना जेव्हा प्रत्यक्ष समोरासमोर भेटतात.तेव्हा त्यांना हसू की रडुहेच कळत नाही.तोंडातलं पाणीच पळतं.डोक्यात हजार प्रकारच्या विजा कडाडतात.कारण श्रेया पाटील आणि रंजित देशमुख हे दुसरे तिसरे कोणी नसुन शोभा आणि निलेश हेच दोघे असतात.ज्यांनी आठ महीन्यांपुर्वी breakup केला होता.नशीब सुद्धा कधीकधी हुकुमाचा एक्काच दाखवतं.ज्याने समोरचा फक्त निरुत्तर होतो.मग नाईलाजाने दोघेही कॅफेबार मध्ये जातात.दोघेही आपापल्या कॉफीकडे बघत पहीला कोण बोलतंय याची वाट पहात असतात.शेवटी निलेश पुढाकार घेऊन तिला म्हणतो,i m so sorry मी फेकअकाउंट काढायला नको होतं.
तीःno i m sorry मी ही फेक अकाउंट काढलंच होतंना...पण तुला माझा आणि मला तुझा आवाज कसा काय नाही ओळखताआला?याचंच आश्चर्य वाटतं.
तोःबहुतेक तु तुझ्या मोबाईलचा स्पीकर प्रॉब्लम अजुन रिपेअर केला नसशील म्हणुनच....
तीः(हसुन)हो बरोबर आहे..,.....,.
एकमेकांशी ते फेसबुकद्वारे खुपच attach झाले असल्यामुळे,अशा प्रकारे पुन्हा एकदा वेगळं होणं त्यांना मान्यनसतं. एकमेकांच्यासमजु तदारपणामुळे त्यांच्यात Patch up होतो,आणि पुन्हा एकदा ते एकमेकांशी relationship मध्ये बांधले जातात....आणि आता तर शोभाने तिच्या मोबाईलचा स्पीकर प्रोब्लम रिपेयर करुन घेतलाय आणितिचा मोबाईल आता फक्त तिच्याजवळचअसतो. ..निलेशही आता शोभाला पुरेसा वेळ देत असतो.....त्यामु ळे फेसबुकमुळे का होईना ते दोघे पुन्हा एकत्र आले...
मित्रांनो prapose केल्याने जोड्या बनत नाहीत किँवा breakup केल्याने त्या तुटतही नाहीत,त्यांचं भविष्य वर लिहीलं गेलेलं असतं.ज्याच्यावि रुद्ध जाऊन तुम्ही ते जोडण्या तोडण्याचं कामनाही करु शकत.एकट्याशी बांधलेला प्रेमाचा दोर कितीही प्रयत्न केला तरीतो तुटत नाही,शेवटी तुम्हाला तिथेच यावं लागतं जिथुन तुम्ही सुरवात केलेली असते.

Friday, August 24, 2012

एक प्रेमकथा



अबोली जरा जास्तच बोलतेय!

माध्यम हा एक अजब प्रकार आहे. जो केमिस्ट्रीमधे वापरतो आणि मानवी नातेसंबंधामधेही!मला एक फार गोड माध्यम मिळाले काही दिवसांपूर्वी! कर्नाटकातल्या एका लहानशा गावी जाणे झाले. मी बर्‍याच वर्षांपूर्वी आणि एक दोनदाच तिथे गेले असेन. आईच्या माहेरचे दुसरे गाव. तिथला मोठ्ठा वाडा आठवायचा मलाही अधून मधून.. धुळीने भरलेल्या निमुळत्या वाटेवरुन आणि निळी बस आली की मुकाट्याने रस्त्याबाहेर जाऊन थांबण्याची कसरत करत आम्ही पोहोचलो. वाटेत जरा मोकळे रान दिसले, की ’हा बाळोबाचा माळ! इथे रात्री भुते येतात असे आम्हाला सारुक्का सांगायच्या लहानपणी!’ इथून स्टोरीला सुरवात झाली. नंतर आधीच्याहून मोठे आणि वैराण असे तीन माळ आम्ही मागे टाकले आणि प्रत्येक वेळी आधीचा बाळोबाचा नव्हे हाच तो! हे कन्फर्म होत गेले. तिसर्‍या आणि शेवटच्या माळावर कुणीही वाद घातला नाही आणि तिथेच येऊन भुते नाचतात यावर शिक्कामोर्तब झाले.
’इथून वळून सरळ आलं लगेच!’ मधल्या ’लगेच’चा अर्थ दिड तास हे लवकरच कळून चुकले. दिड तासात शक्य तितकी धूळ आणि उन खात आम्ही मुक्कामापर्यंत पोहोचलो. फारसं काही बदललेलं नव्हतं. सरकारी योजना तळागाळात जाऊन जितके बदल करता येणं शक्य होतं तितकच! तोच रस्ता, निमुळता, रस्ता नसलेला रस्ता.. समोर वाडा.. या वेळी वाडा थोडा भकास वाटला. आम्ही आत गेलो. 

थोडा वेळ गेल्यावर आजूबाजूचे बदल टिपत आईच्या गप्पा सुरु झाल्या. इथे आम्ही हे करत होतो, तिथे ते खेळत असायचो.. वगैरे.. घर दाखवताना मधल्या लहान सोप्यापाशी आलो. तिथे गौरी बसायच्या म्हणे! त्यांना करत असलेल्या कमानीची उंची हाताने दाखवत ती भराभर दारं उघडत आत गेलीकाहीतरी शोधतते तिथे आहे का चाचपडत असल्यासारखीकाही गोष्टी मिळाल्या असतील..बर्‍याच दिसल्या नसतील

"हे आज्जीच कपाटअजूनही आहेलाकडी आणि मजबूत!"

ते पिवळट लाकडी कपाटअडगळीत जाण्याच्या मार्गावर असलेलं.. तोंडावर भलमोठं कुलुप घेऊन कोपर्‍यात तिरकं बसल्यासारखं.. कधी आज्जीच्या बर्‍याच गोष्टी पोटात दडवल्या असतील त्याने!आकडेमेणाचं कुंकूहस्तिदंती पिनानऊवारी कडक पोताच्या साड्याक्वचित सोन्या-चांदीच्या वस्तूही.. घरातल्या मुली परकरात होत्या तेव्हाच एकदम नऊ बाळकृष्ण आणले होते म्हणे तिने..सख्खंचुलत वगैरे काही न मानतासगळ्या मुलींचे जे असेल ते एकदमचमुलांच्याही काही गोष्टी कधी दडल्या असतील त्यातजमवलेल्या बिट्ट्यागोटेहातातले नाजूक कांकण.. आवडते पुस्तक किंवा लहान भावासाठी खाऊ!

"ही लहान खिडकी म्हणजे आमची हेरगिरी करण्याची जागा.. बाहेरचं सगळं दिसायच इथून.. पण बाहेरुन आत काहीच नाही.. चिकाचा पडदा असल्यासारखं!"

त्या खिडकीला आता जळमटांनी वेढले आहेप्रयत्न करुन बघूयात म्हटले तरीआतून आता बाहेर काही दिसणार नाहीबाहेरुन मात्र विणकाम करुन भरलेला मोर वरती लावलेला दिसतो

"इथे आत्ता नुसती मोकळी जागा आहेपण जुनं स्वयंपाकघर इथेच होतंआणि सकाळची न्याहरी,पंगत इथेच असायचीआम्ही सगळे एकत्र..."

'एकत्र’ नंतरची पाच सेकंदांची इनोसंट गॅप मोठी आहे आणि उदास आहे

"आणि हे देवघरइथे रोज परसातल्या फुलांचा ढीग असायचाआणि शेजारी हा लोण्याचा खांब"
"लोण्याचाकुठे तेकाय ते?"
"म्हणजे ताक घुसळायचा खांबतुझी आज्जी इथे ताक घुसळून झाल्यावर थोडे लोणी काढून या खांबाला लावून ठेवायची आणि मग नंतर ते लोणी खाण्यासाठी आम्ही ती जाण्याची वाट बघत बसायचोतिने जास्तित जास्त लोणी खांबाला लावावे असे आम्हाला वाटायचे!"

तो सुबक नक्षिदार खांब अजूनही तुपकट होवून चमकतोय असं वाटलंदेवघरा शेजारीच त्याची जागा आहे.
"आणि मागे पाहिलंस काखूप मोठ्ठी जागा आहेम्हणजे होती.. आता काय झालंय कुणास ठाऊक!"

वाड्यामागची मोठ्ठी जागा मलाही आठवत होती.. संध्याकाळी सातनंतर तिथे भूत येते असं काहीस आमच्या मनावर ठसवण्यात आलं होतं मग खेळ अर्धवट सोडून आत यावे लागायचे.

"अग्गोबाईचाफा आहे तसाच आहेचैत्रात या चाफ्याची फुले वाहतातआपल्या मळ्यातला लाल चाफातसा हा पांढरा चाफाआणि ती बटणगुलाबाची फुलेआणि अबोलीमिरचीची रोपं.."

दिसेल त्या सगळ्या सोयर्‍यांना नावाने हाका मारुन झाल्यात्यांचा ’ ही पोहोचला असेल तिच्यापर्यंत!

"इथे कुठेतरी खरं का खोटं आज्जीचे घर होते ना आई?"
"हो.. तेच ते लहान खिडकी दिसतेय ते घर"
जवळच राहणार्‍या आज्जी.. प्रत्येक दोन वाक्यांनंतर त्यांना खरं का खोटं?’ असं विचारायची सवय होती.. त्याच नावाने त्या ओळखल्या जायच्यालांबलचक असलं तरी बाकी मंडळींनी किंवा आम्ही त्यांचे पेट नेम घेण्यास कधीच कंटाळा केला नाही

"झालं आताबरीच वर्षे झाली त्यांना जाऊनहे पाहिलंस काटेबल टेनिसचं टेबलआणि बंदूक?"
आजोबांच्या खास खेळाच्या खोलीत जुन्या भिंतीला मुटकुळं करुन टेकलेलं हिरवं टेबल आणि कोपर्‍यातली बंदूक.. त्या खोलीतल्या जुनेपणाच्या खुणा फ़्लॅट स्क्रिन टिव्हीला आणि नविन सजावटीला मुळीच सामावून घेत नव्हत्याबर्‍याच वर्षांपूर्वी जेव्हा इथे आले होतेतेव्हाही काही बदल असतील कदाचितनिरखून पाहिले नव्हते इतकंच

आपण आपलं नॉस्टॅल्जिक होणं बरेचदा पाहतो.. कुणा माध्यमातून हे पाहणंजसं रंगिबेरंगी धागे विणताना पहात त्यातलीच एक नक्षी होऊन जाणं.. तिच्या सांगण्यात मी कुठेच नव्हते पण तिथे फक्त मीच होतेघरभर फिरुन ओळखीचे काही नादरंगहेरगिरीची खिडकी जिथे उघडतेत्या सोप्यातले काही उन्हाळ्याचे दिवसमाजघरातल्या पावसाळी रात्रीलाकडी जुन्या झोपाळ्याचे चार दोन झोके सगळं सगळं गोळा करुन ती म्हणाली, "आता जाऊयात आपणउशिर होतोय.. " 
थकलेल्या,वाकलेल्या काकी परत येण्याबद्दल बजावत होत्याबाहेर दारातच मस्त अबोली फुलून आली होती

"अबोली जरा जास्तच बोलतेय! "

आणि परतीच्या प्रवासात आईच्या गाठोड्यात आणखी एक बोलणारा रंग अधिक झाला होता.



मीनल

Wednesday, July 25, 2012

एक कथा- ५ ( शेवटचा भाग)


माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो नां? जी गोष्ट सहज मिळत असते, ती नको असते, आणि एखादी गोष्ट थोडी हाताबाहेर जाते म्हंटल्यावर मात्र ती हवी हवीशी वाटते! रीनाला काल पर्यंत रोहनन जेंव्हा इथुन जाईल तेंव्हा त्याच्या मनात आपल्याबद्दलची वाईट इमेज नसावी, केवळ इतकीच इच्छा होती. पण आज मात्र जेंव्हा शितलची इंटीमसी थॊडी जास्त वाटली, तेंव्हा मात्र उगिच काहीतरी मिस होतंय तसं वाटणं सुरु झालं होतं.
प्रत्येक गोष्टीचं SWOT ऍनॅलिसिस करून निर्णय घेण्याची पध्दत पर्सनल आयुष्यात पण वापरा असं सर एमबीए च्या क्लासमधे नेहेमी म्हणायचे. पण खरंच ते शक्य आहे कां?? रोहन चा साधा सरळ स्वभाव तिला कालपासून जास्त अपिल होत होता. उगिच मनातल्या मनात कम्पॅरिझन केली जात होती, रोहन आणि गौरवची.. कधी गौरवचं पारडं जड, तर कधी रोहनचं !
रीनाला स्वतःलाच आश्चर्य वाटलं, की आपण हा असा विचार का करतोय? शितलच्या घरी जेंव्हा ती दुपारी गेली होती, तेंव्हा शितलची रोहन बरोबरची जवळीक बघुन तिला तिथुन रोहनने निघुन यावं असं वाटत होतं. आपल्याला असं कां होतंय?  रोहनसोबत ती काल दिवसभर ( जवळपास) होती, पण एकदाही रोहनचा ऍप्रोच तसा नव्हता. सहेतुक स्पर्श एकदा पण झाला नव्हता रोहनचा. त्याच्या सज्जनपणाची ही पावतीच समजायची कां??
अचानक रोहन बद्दल वेगळं फिलिंग डेव्हलप होणं सुरु झालं होतं तिच्या मनात . आपण प्रेमात तर नाही ना पडलो रोहनच्या?? तिच्या मनात एक विचार आला, आणि तितक्याच त्वेशाने तो तिने झटकून टाकला. कसं शक्य आहे?? मी एक बिई + एमबीए होतकरू विद्यार्थिनी, आणि तो केवळ एम ए !! कसं शक्य आहे आपण त्याच्या प्रेमात पडणं?? प्रेमात पडतांना अशा गोष्टींचा विचार केला जात नाही, हे तिला आज जाणवलं.
बरेचदा काही गोष्टी आपोआप होत असतात. प्रेम पण त्यातलंच. पण त्याने असं काय केलं की आपल्याला त्याच्याबद्द्ल जवळीक वाटते आहे? काही समजत नव्हतं तिला. असूया ही फक्त प्रेमात पडल्यावरच वाटते. कदाचित म्हणुनच शितल जेंव्हा त्याच्याशी मोकळेपणाने वागत होती, तेंव्हा चिडचीड होत होती आपली.
रोहन-शितल ला बघून किंवा शितल चा रोहनमधला इंटरेस्ट बघुन तिचा स्वतःवरचा ताबा सुटतो की काय असं वाटत होतं.
*********************
जेवणाची वेळ झाली होती. शितलची  सुरुवातीला   रोहनशी बोलण्याची  इच्छा नव्हतीच.. जे काही  बोलणं सुरु होतं,  ते केवळ लेलेंच्या सांगण्यावरूनच. पण जेंव्हा रोहन गप्पा टप्पा सुरु झाल्या, तेंव्हा मात्र तिला त्याची बौद्धीक चुणूक चांगलीच जाणवली होती. तिला आठवलं की, रोहन दहावीला असतांना बोर्डात राज्यातुन पाचवा आला होता! कसं विसरलो होतो आपण हे??  नंतरचे शिक्षण पण त्याने गावातच आर्ट्स कॉलेज मधेच घेतले होते, कदाचित त्यामुळे थोडा बुजरा झाला असेल तो. पण मराठी मधे एम ए करून त्याची पुढची झेप मात्र वाखाणण्यासारखी होती. त्याचं अफाट जनरल नॉलेज पाहून तर ती आवाकच झाली होती. एक मन तर म्हणत होतं की ठिक आहे, करू या लग्नं.. काय हरकत आहे, तर दुसरं मन अजूनही एम एस मधेच गुंतलेलं होतं.
बरं,   केवळ वडिलांचे म्हणणे टाळायचे नाही म्हणून त्याच्याशी बोलणं सुरु केलं होतं, पण त्याचं बोलण्याच्या ओघात जेंव्हा त्याचा आयक्यु समजला, तेंव्हा मात्र ती खूप इम्प्रेस झाली – आणि नकळतच त्याच्या प्रेमात पडली- की ही एक कॅल्क्युलेटीव्ह स्टेप घेतली आपण? शितल स्वतःशीच विचार करु लागली.
प्रत्येक गोष्टीमधे कॅलक्युलेशन्स करुन निर्णय घ्यायची तिची नेहेमीची पध्दत इथे मात्र नापास झाल्यासारखे जाणवत होते तिलाच. इतक्या लवकर लग्न वगैरे करुन घर सांभाळण्यापेक्षा अमेरिकेत जाऊन एमएस करावे, आणि लग्नाचे काय ते नंतर बघावे असे तिला वाटत होते. पण दुसरं मन वडिलांच्या इच्छेविरुध्द काही करण्यास तयार नव्हतं.. काय करावं??
******************************************
रोहन दोघींच्या समोर बसला होता. रीना कडे पहाण्याचा दृष्टीकोन आता मात्र थोडा वेगळा झाला होता. ती आवडायला लागली होती. तिच्या बद्दल साशा जेंव्हा बोलली, तेंव्हाच तिच्या बद्दल एक वेगळाच रिस्पेक्ट निर्माण झाला होता त्याच्या मनात. सौंदर्याच्या बाबतीत तर काहीच प्रश्न नव्हता. ती होतीच सुंदर !!
शितल चे त्याच्याशी वागणे थोडे खटकत होते रीनाला. आता इतक्या वर्षांच्यानंतर भॆटतोय आपण, पण बाल मित्र म्हंटलं तरीही तिची वागणूक अतिशय फ्री वाटत होती रोहनला. सारखं जाणवत होतं, की तिला काहीतरी नक्कीच माहिती आहे, जे इतर कोणालाही माहिती नाही- आणि म्हणूनच तर ती इतकी मोकळी वागत नाही नां आपल्याशी?? कालच लेले पण गावाहून परत आलेत!!! दॅट क्लिअर्स द मॅटर!!! रोहनच्या एकदम सगळं काही लक्षात आलं. :) रोहन स्वतःशीच हसला.
*******************************************
लेले वाट बघत होते की रोहन आणि शितल एकमेकांना पसंत करतात का ह्याची. जर त्या दोघांचं लग्न झालं तर सगळी काळजी मिटणार होती त्यांची नाहीतर………………………??
रोहन उद्या रात्री परत जाणार होता. मेडीकल टेस्ट झाल्यावर. तो पर्यंत त्याच्या मनाचा अंदाज घेता आला तर बरं होईल, असंही त्यांना वाटत होतं.  शितलला नाही  म्हणण्यासारखं काहीच नाही, असं त्यांनी स्वतःलाच बजावलं.. आणि मन शांत करण्याचा प्रयत्न केला.
*******************************************
सुमाताई संध्याकाळपासून थोड्या चिंतेतच होत्या. परवाच्या रीनाच्या उशिरा येण्यामुळे झालेला त्यांच्या मनावरचं मळभ  काही पुर्ण पणे उतरलं नव्हतं . रोहिणी मधे जाउन नांव नोंदवायचं… हे त्यांनी दोन दिवसात दहा पेक्षा जास्त वेळा चितळ्य़ांना सांगितलं, पण चितळ्य़ांनी मात्र पुर्ण दुर्लक्ष केलं. ते म्हणत होते, आधी एमबिए होऊन जाउ दे, नंतर मग काय ते बघु!!
काल रात्री जेंव्हा रीना – रोहन परत  घरी आले, तेंव्हापासून  रीनाच्या वागण्या,बोलण्यातून ती रोहनकडे आकृष्ट झाल्याचे सुमाताईंना जाणवत होते. त्यामूळे रोहन लवकर गेला तर बरं!! अशी इच्छा होत होती. आता हीच गोष्ट जर चितळ्यांना सांगितली, तर ते उडवुन लावतील, आणि वेड्यात काढतील, म्हणतिल, ’काविळ झालं की सगळंच पिवळं दिसतं’..सुस्कार सोडला, आणि सरळ आपलया खोलित जाउन त्या पलंगावर आडव्या पडल्या. उद्या रोहनसमोरच या गोष्टीचा निकाल लावू असे त्यांनी मनात ठरवले.
****************************************************
रीना ठरल्याप्रमाणे रोहनला घेउन सिनेमाला गेली शितलला पण चल म्हंटलं, पण तिचा अभ्यास होता. येतांना मल्टिप्लेक्स मधेच स्नॅक्स हादडून आल्याने घरी आल्यावर जेवायचं वगैरे काहीच नव्हतं. रीना कार चालवत होती. एकदम तिने कार थांबवली आणि  रीनाने निर्णय घेतला, आधिच उशीर झाला आहे आणि आता आणखी होण्या आधि आपल्या मनात काय आहे ते रोहनला सांगून टाकावं.  पण पुन्हा ऍक्सिलरेट करुन त्याला जे सांगायचं  ते सांगण्याचा  विचार बदलला.
वि. स. खांडॆकरांनी म्हंटलं आहेच , की थोडं अविचारी व्हा, म्हणजेच काहीतरी निर्णय घ्याल, अन्यथा, नु्सता विचारच करीत रहाल. रात्री जेवण झाल्यावर ती रोहनच्या खोलीत गेली. रोहन नेहेमीसारखा पुस्तकात तोंड खुपसून बसला होता. रीनाने रागाने ते पुस्तक काढून घेतले आणि म्हणाली, ’एक सुंदर मुलगी समोर उभी असताना तुला हे रटाळ पुस्तक वाचावसच कसे वाटते?”
रोहन गालातल्या गालात हसत म्हणाला, ’सुंदर मुलगी – कुठे आहे गं ती? मला  नाही दिसली ती’-
रीना वैतागली आणि त्याला मारायला घावली त्याच्या अंगावर…. अगं… अगं.. थांब जरा… !!! रीनाच्या नजरेतले भाव बघुन त्याला समजलं की तिला काय म्हणायचंय ते.  रोहन म्हणाला,’ ठिक आहे, मान्य की एक सुंदर मुलगी समोर आहे,   मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे?-  त्याच्या या बोलण्यावर रीनाची नजर जमी्निकडे वळली. अन ती नासी फडकेच्या नायिके प्रमाणे अंगठ्याने जमिनीचे नसलेले पोपडे काढण्याचा प्रयत्न करणे सुरु केले .
रीना त्याच्या समोर  जावून बसली, डोळ्यानी जमिनीकडेच पहात म्हणाली, “रोहन?”
रीना कडे पहात  रोहन म्हणाला, – खरंच??
रीना म्हणाली.. होSSSSSSS!
रोहन म्हणाला “जी गोष्ट तुला इतके वर्षात सांगू शकलो नाही ती किती पटकन सांगितलीस तू?? “
रोहन खूप आनंदात होता आज, त्याला त्याच्यावर प्रेम करणारी प्रेयसी हवी होती,   ती आज मिळाली होती.   रात्रभर त्याला झोप लागली नाही, कधि एकदा आईला ही गोष्ट सांगतो असे त्याला झाले होते.
*****************************************
सकाळी नेहेमीसारखे सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवर नाष्टा करत होते. सुमाताई मनातल्या गोष्टी कशा बोलायच्या याची जुळवा जुळव करत होत्या.
काहि तरी बोलायचे म्हणून चितळ्यांनी रोहनला विचारले, अरे रोहन तुझ्या इंटरव्ह्युचं पुढे काय झालं? तू परत कधी जाणार गावी? जर तिकडे सिलेक्शन झाले नसेल तर मला सांग, मी बघतो  ,मला काही करता येइल काय ते. अगदी कुठेच शक्य झाले नाही तर मात्र मी काहीतरी सोय करतो आमच्या कंपनीत.
रोहन काही बोलला नाही. फक्त म्हणाला की बहुतेक काही गरज पडणार नाही.
सुमाताईंनी आपल्या मनातले विचार मनातच ठेवले, उलट खुश झाल्या मनोमन की आता रोहन परत जाणार म्हणून.. रीनाला  खूप उदास वाटत होतं, आपलं त्याच्यावर प्रेम आहे, कालच लक्षात आलं , ते उड्याच माराव्याश्या वाटत होत्या.
ब्रेकफास्ट टेबलवरची प्रत्येक व्यक्तीच्या मनात निरनिराळे विचार सुरु होते. .
*****************************************
रोहनने नंतर गावी फोन करून, रीनाबद्दल त्याला काय वाटते ते भैयासाहेबांना सांगितले. ते सुद्धा आश्चर्यचकित झाले, हा गेलाय ईंटरव्ह्यु   द्यायला आणि बातमी काय सांगतोय. एक मन आनंदात होत आणि दुसर मन खात होतं मित्राला दिलेला शब्द मोडावा लागणार म्हणून. आता लेलेला काय सांगावं बरं??
**********************************************
रोहनची मेडीकल टेस्ट झाली आणि रीझल्ट यायला अवकाश असल्याने तो गावाला निघुन गेला.रोहन घरी गेल्याला, आता दोन दिवस होऊन गेले होते. लेले कधी नव्हे ते चितळ्यांच्या घरी गेले आणि त्यांना म्हणाले,
चितळेतुमच्या मुलीने आमचा आय  एस जावई पळवला हो….
चितळे म्हणाले? आय ए एस जावई?आणि माझ्या मुलीने पळवला?
म्हणजे तुम्हाला माहिती नव्हते ?? अहो रोहन इथे आय ए एस च्या इंटरव्ह्यु साठी आला होता. रिटन एक्झाम पास झाला होताच तो, फक्त इंटरव्ह्यु बाकी होता, तो द्यायला इथे आला होता तो. आता लवकरच कुठेतरी कलेक्टर म्हणून जॉइन करेल तो.मी गावी गेलो होतो, तेंव्हा  भैय्यासाहेबांशी बोललो होतो. ते पण तयार होते शितलला सून करुन घ्यायला. शितलला पण तो आवडला होताच, पण रोहनने भैय्यासाहेबांना घरी सांगितलं की त्याला रीनाशी लग्नं करायचंय म्हणून.. आणि रीनाची पण हरकत नाही म्हणाला तो..
चितळ्यांना हा शॉक ऑफ द लाइफ होता. आनंदाने  त्यांनी लेलेंना मिठीच मारली.सुमाताइंना म्हणाले , की रीनाचे लग्न ठरवले हो, तिने…. सुमा ताई बोलणं ऐकतच होत्या, त्यांनाही खूप आ्नंद झालेला होता. पोरीनं नशिब् काढलंय होSSSS!  म्हणत त्या देवापुढे साखर ठेवायला गेल्या.
रीना हे सगळं बोलणं उभं राहून ऐकत होती.. आणि  खुश झालेल्या रीनाला तर उड्याच माराव्याश्या वाटत होत्या.ती आत पळाली रोहनला फोन करन खुश खबर द्यायला.


 महेंद्र कुलकर्णी

एक कथा- ४


रोहन आपण समुद्रावर जाउ या का?व्हाय नॉटशुअर.. चालेल मलादोघंही बँडस्टँडला पोहोचलेदाणे वाला भैय्या गळ्यात पाटी अडकवून तिथेफिरत होताआजुबाजुला कुठेही नजर गेलीतरीही बँडस्टँडवर जे काही नेहेमी सुरु असतं तेच सुरु असलेलंदिसत होतंएक वेळ तुम्हाला जर पहायची लाज वाटत असेलतर तुम्ही डॊळॆ बंद कराअशी प्रवृत्ती दिसुनयेत होती बसलेल्यांची.ह्या भैय्या लोकांना बरोबर समजतं की कोणासमोर जाऊन उभं रहावं तेअगदीरंगात आलेल्या जोडप्यासमोर उभं राहून ते ‘सिंग चाहिए क्या?’म्हणुन विचारतात.. आणि मग नंतर तेकपललवकर जा रे बाबाम्हणुन नको असतांना पण दाणे विकत घेते.
गेले दोन दिवस रोहन घरात होतातरीही रीना त्याच्याशी काहीच बोलली नव्हतीम्हणजे तसा वेळचमिळाला नव्हताप्रत्येक वेळेस रोहन कडे दुर्लक्ष करुनच रीना निघून गेली होतीएका खडकावर जाउनबसण्यापेक्षा त्यांनी किनाऱ्यापासून थोडं जवळंच बसणं पसंत केलंतेवढ्यात रीना ची मैत्रीण साशा तिच्याबॉय फ्रेंड बरोबर आलीरीना ला तिथे बसलेली बसून ती एकदम चमकलीचपण सोबत रोहन ला बघून मात्रएकदम म्हणाली
’काय गं रीनानेहेमी म्हणतेस ना की माझा कोणी बॉय फ्रेंड वगैरे नाही म्हणून’मग आता हा तो कोण ?’हॅंड्सम आहे बरं कां , एकदम मॅनलीआवडला बरं का मला पणरीना कांही बोलण्याच्या आताच तीआपल्या बॉय फ्रेंडला म्हणाली.. ही रीना आहे नांएक नंबरची काकू बाई आहेनेहेमी सांगते की ती कधीचअफेअर वगैरे करणार नाहीकिंवा कोणी बॉय फ्रेंड वगैरे पण नाही तिचातिचे मित्र मैत्रिणी आहेत बरेचअरेगृपमधे पण असून नसल्यासारखीच असते बरं कां. ’ ओके रिनाएंजॉय युवरसेल्फ ,मी निघते गं.
रोहनला कल्चरल डिफरन्स चा शॉक तर कालच मिळाला होतातिच्या रात्री उशिरा येण्याच्या धक्क्या पेक्षातिच्या बद्दल साशा ने जे बोलली त्याचा धक्का खूप जास्त बसला होता रोहनलात्याला वाटत होतं की रीनाही अतीशय फॉर्वर्ड हाय फाय टाइपची मुलगी आहेपण साशाच्या कॉमेंटमुळे हे लक्षात आलं की रीना अगदीडाउन टु अर्थ मुलगी आहेकेवळ फॅशनेबल कपडे घालते किंवा मोठया शहरात रहाते म्हणुन रीना वाईट ठरुशकत नाही.—-आणि त्याला उगिच बरं वाटलं..
रोहन म्हणालाअगं ती वाईट काय बोलली तुलाती चांगलंच तर बोलली नां तुझ्या बद्दल?? पण रीनाचंरडणं काही थांबत नव्हतंरीना चे डोळे पुसायला आपला हातरुमाल पुढे केला रोहननेबराच वेळ गुडघ्यातमान घालून बसली होती ती.
रोहनने विषय बदलायचा म्हणून तिच्याशी गप्पा मारणं सुरु केलंकाल रात्री उशिरा घरी आल्यामुळे आई जेरागावलीआणि काल पासून मनाला बोचत असलेला तो गौरव एपीसोड बद्दल जो पर्यंत रोहनला आपण खरंकाय ते सांगत नाही तो पर्यंत तिला चैन पडणार नव्हती.
रोहनला पण कालपासून हाच प्रश्न सतावत होता की ती का रडत होती?? शेवटी मनाचा हिय्या करून त्यानेविचारलेच, ’ काल रात्री काय झाले होते – का रडत होतीस तू?” एवढं विचारायचीच देरकी रीना जी रडायचीथांबली होती ती पुन्हा एकदा रडू लागलीरोहनला काय करावं ते कळंत नव्हतंशेवटी त्याने हिम्मत करूनतिच्या खांद्यावर हात ठेउन तिचे सांत्वन केलेतरीपण तिचे रडणे काही कमी होत नव्हते.
शेवटी बऱ्याच वेळा नंतर रीना शांत झाली आणि तिने गौरव बद्दल तिला वाटणारं अट्रॅक्शन , त्त्यानंतर च्याकालच्या बिहेविअर बद्दल सांगितलंआणि उशिर का झाला हे पण सांगितलंरोहन म्हणाला, ’इतकीकाळजी करण्यासारखं नाही तेअसं होतंच असतं या वयात.’ एखाद्या मुलाबद्दल अट्रॅक्शन वाटणं सहाजीकआहे.त्यात एवढं वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही.
रोहन म्हणालातुला आठवतं कांलहान असतांना पण खेळतांना भांडणं झाली की तू अशीच रडायचीसमाझ्या जवळ येऊन.. रीना ने वर पाहिलं.. डोळ्यातुन निघालेल्या अश्रूंमुळे चेहेरा खूप उतरल्या सारखादिसत होतापण लहानपणीच्या आठवणीने हसूं आलं चेहेऱ्यावर.
भैय्यासाहेब जोशी आणि राजशेखर चितळे बाल मित्र असल्यामुळे मुलांची म्हणजे रीना आणि रोहन वगैरेची भेट लहानपणी नेहेमीच होत होतीराजशेखर यांचे आई वडील जिवंत असतांना अगदी नित्य नेमाने तेकोंकणात जायचेरोहन, रीना, शितल हे सगळे  अगदी लहानपणापासूनच एकत्र खेळलेले. एकमेकांशी असलेली ओळख आणि त्यामुळे असलेला संबंधातला सहजपणा होता. रीना आणि शितल शहरातरहाणाऱ्याम्हणून त्यांच्या वागण्याबोलण्यात थोडा जास्त स्मार्टनेस होतारोहन नेहेमीच रिसिव्हींग एंडलाच असायचा.जुन्या लहानपणीच्या गोष्टी आठवुन हसु फुटलं ्दोघांनाही..
रीना चमकलीआणि तिने रोहनच्या डोळ्यात बघीतलंनजरेला नजर मिळाली.. आणि तिला त्याच्यानजरेतला सच्चे पणा लक्षात आलारोहनच्या पण  बोलताच लक्षात आलं की तिला काय म्हणायचंय ते –की त्याचा गैरसमज झालाय? रीनाला अजूनही नक्की समजलं नव्हतं की काय होतंय ते.
थोड्यावेळाने तिथुन उठुन दोघेही परत निघाले घरी जायलाजाता जाता रोहनला घेऊन ती मित्रांकडे गेलीहोतीमित्रांच्या गृपमधे थोडावेळ थांबून परत ती दोघंही घरी पोहोचली.गृपच्या मुलांना तिने रोहन हाबालमित्र म्हणून ओळख करुन दिली , जेंव्हा सगळ्यामित्रांना तो कोंकणातून एका लहानशा गावातून आलाय हे लक्षात आल्यावर मात्र त्याच्याकडे दुर्लक्षंच करणे पसंत केले. जेंव्हा रोहनला अव्हाइड केलं जात आहे हे लक्षात आले, तेंव्हा तिने पण लवकरच काढता पाय घेतला आणि दोघंही घरी आले. 
रोहनचा मुक्काम दोन दिवस वाढला होताआता उद्याच्या दिवस घरी काढला की मग परवा मेडीकल टेस्ट..आणि मग झालं!!!
*******************************
लेले परत मुंबईला पोहोचले होतेरात्रीचे दहा वाजले होतेरोहन शेजारी चितळेंच्या घरी आहे , हे त्यांनामाहिती होतेचत्याला उद्या घरी बोलावायचे जेवायला.. हे त्यांनी पक्के केले होतेचितळेंच्या घरी फोनकेला ( शेजारी घर असून सुध्दाआणि रोहनला दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचे निमंत्रण दिलेरोहन ने नाहीम्हणण्याचा बराच प्रयत्न केलापण लेलेंनी फारच आग्रह केला म्हणून हो म्हंटले.
दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवणाचे नक्की झालेवेळ होती एक वाजताची… शितल ला पण आधिच सांगितलेरोहन बद्दल- आणि त्याच्या वडिलांशी झालेल्या बोलण्याबद्दल. हे पण सांगितलं की रोहनला हे ठाउक नाही. शितल आणि रोहनची भेट घालून द्यावी आणि मग बघावं काय होतं ते.. असा विचार केला होता लेलेंनी.
घरी शितलला आधीपासुन सांगितलं  रोहन बद्दल  त्यांनी त्यांचं झालेलं बोलणं  .तू रोहनला बघ, आणि मग नंतरच काय तो निर्णय घे. अगं रोहनसारखा मुलगा तुला शोधुन पण सापडणार नाही. तुझं एम एस वगैरे बाजुला ठेव आणि थंड डॊक्याने विचार कर की तुला काय हवंय ते!! शितलला पण वडिलांच बोलणं पटलं आणि नाही सुध्दा!! तरीपण रोहन जेंव्हा उद्या दुपारी घरी येईल तेंव्हा घरी रहायचं कबूल केलं तिने,. त्याला भेटु आणि नंतर मग काय निर्णय घ्यायचा तो घेऊ.
**********************************
सकाळी ्रोहन  उठून  तयार झाला आणि ब्रेकफास्टच्या टेबलवर जाउन बसला . रीना पण आधीपासूनच येउन बसली होती. रोहन कडे तिने पाहिले, आणि  लक्षात आलं की रोहन  आज टेन्शनफ्री बर्ड सारखा प्रफुल्लीत दिसत होता. हलकेच हसली ती त्याच्याकडे बघुन.चितळेंनी विचारले की इंटरव्ह्यु कसा झाला?
रोहन म्हणाला, की इंटरव्ह्यु छान  झालाय, आणि परवा मेडीकल आहे . त्या मुळे इथला मुक्का एक दिवस वाढ्वावा लागतोय. हे पण सांगितलं की लेलेंचा फोन आला होता , आणि त्यांनी पण आज जेवायला  बोलावलंय दुपारी.   चितळेंना आश्चर्य वाटले, पण त्यांनी ते दिसू दिले नाही चेहेऱ्यावर. पण तू रहाणार घरीच बरं कां.. आणि ही ऑर्डर समज हवं तर.. !
***********************************
रोहन दुपारी लेलेंच्या घरी गेला. शितल पण त्याला बघुन खुप खूष झाली. बा्लपणीचा मित्र भेटल्यावर आनंद होणारच.. रोहनला पण शितलचा मोकळा स्वभाव खूप आवडला. शितल चा सेन्स ऑफ ह्युमर खुपच स्ट्रॉंग होता. अगदी लहान गोष्टींवार पण ती   जोक्स क्रॅक करीत होती. रोहन मनातल्या   ,मनात रीना आणि शितलची कम्पॅरिझन करू लागला.
शितल चा मनमोकळा स्वभाव पण त्याला आवडून गेला होता, पण रीनाचा डाउनटुअर्थ टाईपचे कॅरेक्टर पण  मनाला भिडले, रीना दिसते टफ, पण आहे अगदी  मऊ.. मुलायम स्वभावाची. उगिच स्वतःला टफ दाखवायचा प्रयत्न करते , हे त्याच्या लक्षात आलं होतं. काल तर पुन्हा हा पण संशय येत होता की तिला पण आपण  आवडतो की काय? तीची कालची बॅंडस्टॅंड वरुन उठल्यानंतरची देह बोली एकदम वेगळी झालेली होती.
रोहन बरोबर  दुपारी सिनेमाला जायचं ठरवलं होतं रीना ने. ती शितल कडे गेली , रोहनला बोलवायला. शितल आणि रोहन सोफ्यावर बसून गपा मारीत होते. रीना पण समोर बसली .शितलचे मनमोकळे वागणे तिला आज आवडत नव्हते. रोहनशी बोलतांना टाळी दे म्हणून तिने साधा हात जरी रोहन समोर केला , तरीही ती अस्वस्थ होत होती. ….
शितलला पण रोहनमधे इंटरेस्ट डेव्हलप होत होता. कॅल्क्युलेटीव्ह रिस्क म्हणजे रोहनशी लग्न हे तिच्या पक्कं लक्षात आलं होतं. हो म्हणायला हरकत ना्ही…